Thursday, March 26, 2020

महामारी नंतरचे जग



संपूर्ण जगाला आता संकटाचा सामना करावा लागत आहे. आमच्या पिढीने बघितलेले हे सर्वात मोठे संकट.
पुढचे काही दिवस सरकार जे निर्णय घेईल ते कदाचित आपल्या आरोग्य व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला, जागतिक राजकारण आणि संस्कृतीला ला देखील वेगळा आकार देऊ शकेल.

सध्या जास्तीत जास्त लोकं घरून काम करत आहेत. शक्य त्या शाळा ही ऑनलाईन चालू आहेत. सामान्य काळात सरकार, शाळा अशा प्रयोगांना सहज तयार होत नाहीत आता कदाचित सगळं सुरळीत झाल्यावर ही असे प्रयोग केले जातील.

चिनी सरकार आता Facial recognition, वैद्यकीय स्थिति तपासून त्या व्यक्तीच्या हालचालींचा मागोवा घेत रुग्ण कोणच्या संपर्कात आला ते शोधून काढत आहे. अशाप्रकारे एखाद्या माणसाच्या आरोग्याची स्तिथी पासून तो कोणाला कधी भेटतो आणि काय विचार करतो या सगळ्याच रेकॉर्ड सरकार ठेऊ शकते.  भविष्यात याचा उपयोग माणसांवर देखरेख करून नियंत्रण मिळवण्यासाठी होऊ शकतो.

भारत:
भारताच्या बाबतीत पण आपण कसे सामोरे जातो हे फक्त COVID-19 चे नाही तर आपले ही आयुष्य आणि जगात असलेली भारताची प्रतिमा अजून सुधारू शकते.एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा लोकशाही असणारा देश अशा परिस्तिथी ला कसा सांभाळतो हे कदाचित संपुर्ण जग बघत असेल.

COVID-19 चे प्रसार थांबल्यानंतर सर्व देश यातून बाहेर पडल्यानंतर परत एकदा सगळ्यांना चीन कडे manufacturing साठी वळावे लागेल कारण चीन तेवढी क्षमता असणारा देश आहे. तेव्हा आपल्याकडे आता महामारी शी सामना करून आणि जगाला चीनचा पर्याय देण्याची हीच वेळ आहे.

या महामारी च्या लढाई नंतर निश्चितच वेळ येणार आहे ती आर्थिक लढाई ला तोंड देण्याची.

हे सगळ अवघड नक्की आहे पण भारताला Global leadership च्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी पण आताच आहे.